वटपूर्णिमा व्रत काय करावे काय करू नये व सटीक उपाय, विवाहिक जीवनात सुख-समृद्धी येईल
Vat Purnima 2025 Kay Karave Kay Karu Naye, Satik Upay Sukh-Samridhi Sathi In Marathi
पंचांग नुसार जेष्ठ पूर्णिमा तिथी सुरुवात 10 जून सकाळी 11:35 मिनिट होऊन समाप्ती 11 जून दुपारी 1:13 मिनिट पर्यन्त आहे. त्यामुळे पूर्णिमा व्रत 10 जून रोजी करायचे आहे.
हिंदू धर्मानुसार वट सावित्री व्रत महिलांसाठी शक्ति, प्रेम व त्याग चे प्रतीक मानले जाते. ह्या दिवशी सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यसाठी व चांगले आरोग्य लभावे म्हणून निर्जल व्रत ठेवतात. त्याच बरोबर वडाच्या झाडाची पूजा अर्चा करतात. असे म्हणतात की वडाच्या झाडाची पूजा केल्याने महिलांना सर्व देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. कारणकी ह्या वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णु व महेश ह्याच वास आहे. त्यामुळे हा वृक्षाची पूजा केल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद मिळतो.
वट पूर्णिमा ह्या दिवशी महिलांनी काय करावे व काय करू नये:
वट पूर्णिमा ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करावे.
ह्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा अर्चा करणे शुभ मानले जाते.
ह्या दिवशी वडाच्या झाडाला जल अर्पित करून हळद-कुंकू वाहून पूजा करा.
वट पूर्णिमा ह्या दिवशी सावित्री-सत्यवान ह्यांची कथा वाचन करावी किंवा आइकावी.
ह्या दिवशी हातात लाल रंगाचा धागा हातात घेऊन वट वृक्षाला 7 वेळा प्रदक्षिणा मारा.
ह्या दिवशी संपूर्ण दिवस निर्जल व्रत ठेवा.
ह्या दिवशी व्रताचे पारायण करताना महिलांनी आपल्या पतीला कुकु लाऊन त्याच्या पाया पडावे, सत्यव्रताचे पालन करावे, तामसी आहारा पासून दूर राहावे.
पूजा करताना पवित्रता चे खास ध्यान ठेवावे.
जरूरतमंद लोकांना अन्न, फळ,धन व वस्त्र दान करावे.
स्वच्छताचे खास ध्यान ठेवावे.
वट पूर्णिमा ह्या दिवशी आपण कोणत्या सुद्धा वादविवाद मध्ये पडू नये.
जय महिला व्रत करणार आहेत त्यांनी त्यांच्या मनामध्ये कोणते सुद्धा नकारात्मक विचार आणू नयेत. किंवा खोटे सुद्धा बोलू नये.
ह्या दिवशी आपले केस धुवू नये किंवा कापू सुद्धा नये.
सात्विक भोजन करावे.
वट पूर्णिमा ह्या दिवशी छान शृंगार करावा.
वटपूर्णिमा ह्या दिवशी करावयाचे उपाय, विवाहिक जीवनात सुख-समृद्धी येईल
वटपूर्णिमा ह्या दिवसाची महिला आतुरतेने वाट पहात असतात. धार्मिक मान्यता अनुसार ह्या दिवशी विधीपूर्वक पूजा अर्चा केल्याने विवाहिक जीवनात आनंद येईल.
माता लक्ष्मीच्या कृपाने घरात सुख-शांती येते. ह्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली पाहिजे त्याशिवाय आपले व्रत पूर्ण होत नाही. जर आपल्या विवाहिक जीवनात काही समस्या असतील तर वटपूर्णिमा ह्या दिवशी काही उपाय केले पाहिजे त्यामुळे परी-पत्नी मधील संबंध सुधारतील व प्रेम वाढेल.
वटपूर्णिमा ह्या दिवशी वडाच्या झाडाची विधीपूर्वक पूजा करून तुपाचा दिवा लावावा व 7 वेळा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारावी प्रदक्षिणा मारताना हातात धागा घ्यावा. असे केल्याने विवाहिक जीवनात आनंद येतो.
व्रतपूर्णिमा तिथी पूजा मुहूर्त:
पंचांग नुसार पूर्णिमा तिथी आरंभ 10 जून सकाळी 11: 35 मिनिट पासून समाप्ती 11 जून दुपारी 1:13 मिनिट पर्यन्त आहे. त्यामुळे 10 जून मंगळवार ह्या दिवशी वटपूर्णिमा व्रत ठेवायचे आहे.
ब्रह्म मुहूर्त – सकाळी 4:02 मिनिट पासून 4 :42 मिनिट पर्यन्त
विजय मुहूर्त: दुपारी 4:22 मिनिट पासून 5:23 मिनिट पर्यन्त
गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी 7:17 मिनिट ते 7:38 मिनिट पर्यन्त
निशिता मुहूर्त – रात्री 12:01 पासून 12:41 मिनिट पर्यन्त

पूजा साहित्य:
आज काल वेळे अभवी आपल्याला वडाच्या झाडा जवळ जाऊन पूजा करणे शक्य नसेलतर घरीच वडाच्या झाडाची फांदी आणून कुंडीमद्धे लावून, कुंडी पाटावर ठेवून, कुंडीवर स्वस्तिक काढून पाटा भोवती रांगोळी काढून पूजा करू शकता. जर शक्य असेलतर वडाच्या झाडा जवळ जावून पूजा करू शकता.
एक स्टीलची प्लेट किंवा ताट, पाण्याचा गडू, हळद-कुंकूची कोयरी, तुपाच्या फुल वातीचे निरांजन, पान-सुपारी-कॉईन, पंचामृत, साखर, कापसाची माळ, अगरबत्ती, गूळ-खोबरे, कापुर, सूती धागा गुंडाळण्यासाठी, ओटीचे सामानमध्ये ब्लाऊज पीस, गहू, आंबा, फुल
वटपूर्णिमाच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी:
वटपूर्णिमा ह्या दिवशी महिला छान जरीची साडी नेसून दाग दागिने घालून नटून थटून वडाची पूजा करायला जातात. पण ह्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी लाल, हिरवी, पिवळी, नारंगी, जांभळी, निळी, केशरी नेसावी. पण चुकून सुद्धा पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी नेसु नका. आपण ज्या रंगाची साडी नेसाल त्या रंगाच्या बांगड्या घालू शकता.
वडाच्या झाडाची पूजा सोप्या पद्धतीने कशी करावी:
वडाच्या झाडा जवळ जावून प्रथम गडु मधील पाणी घालावे, हळद-कुंकू वहावे, ओटी भरावी, प्रसाद म्हणून पंचामृत, साखर , आंबा केळी ठेवावी, मग सूती धागा घेऊन वडाच्या फांदीमध्ये अडकवावा व 3 किंवा 5 प्रदक्षिणा हातात धागा घेवून माराव्या.
पूजा झाल्यावर प्रार्थना करावी की आपल्या पतीचे आरोग्य चांगले राहून दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे तसेच आपल्या विवाहित जीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्याचे निराकरण व्हावे