श्री स्वामींची 21 दिवसांची उच्च कोटीची सेवा करून सर्व मनोकामना पूर्ण होतील, नियमांचे पालन नकरता
10 July Guru Purnima 21 Divsachi Prabhavi Seva In Marathi
10 जुलै 2025 गुरुवार ह्या दिवशी गुरुपूर्णिमा साजरी करायची आहे. आपल्याला गुरूनची कृपा प्राप्त करून घ्यायची असेलतर आपल्याला काही प्रभावी सेवा करायच्या आहेत. गुरूंच्या सेवा केल्या तर आपल्या जीवनातील अडचणी, प्रश्न, आजार, नोकरीचे प्रश्न किंवा आर्थिक प्रश्न दूर होतील.
आपल्याला ही सेवा 20 जून 2025 शुक्रवार पासून सुरू करायची असून 10 जुलै 2025 गुरुवार पर्यन्त 21 दिवसाची करायची आहे. ही सेवा करताना अगदी मनापासून मनोभावे करा. आपल्याला नक्की त्याचे 100% फळ प्राप्त होतील.
आपण सेवा करताना विशेष काही कडक नियम पाळायचे नाहीत. फक्त सोपे काही नियम आहेत ते आपण सहजपणे पाळू शकता. आता आपण काय छोटेशे सोपे नियम काय आहेत ते पाहू या मग त्यानंतर कोणत्या सोप्या अगदी सहजपणे सेवा करू शकता ते आपण पाहू या. बरेच वेळा स्वामी भक्तांना असे वाटते की नियम कडक आहेत ते आपण पाळू शकू का मग आपण सेवा कशी करायची किंवा पूर्ण होईल का आपली सेवा. पण अगदी सोपे नियम आहेत.
प्रथम आपण नियम काय आहेत ते पाहू या:
1. आपल्याला जेव्हा 21 दिवसाची सेवा करायची असेलतर 20 जून पासून 10 जुलै पर्यन्त करायची आहे. सेवा कोणी सुद्धा करू शकता म्हणजे विवाहित महिला, पुरुष, मुले किंवा मुली सुद्धा. एक गोष्ट लक्षात ठेवा महिला किंवा मुली जर संपूर्ण 21 दिवसांची पूजा करणार असतील तर त्यांनी मासिक काळा मध्ये 4 दिवस सेवा करायची नाही तर त्यांनी सेवा 20 जून च्या अगोदर 4 दिवस अगोदर सुरू केली तरी चालेल. मासिक काळ संपल्यावर चौथ्या दिवशी केस धुवून घरात गुलाबपाणी शिंपडून सेवा परत चालू करायची आहे म्हणजे 21 दिवस पूर्ण होतील. आपण 21 दिवस, 15 दिवस, 7 दिवस किंवा 3 दिवस सुद्धा सेवा करू शकता.
2. आपण स्वामींची सेवा सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता. फक्त आपण दुपारी 12:00 ते 12:30 ह्या वेळा करायची नाही कारणकी ही वेळ स्वामची भिक्षा मागायची आहे. पण शक्यतो एकदा सेवा ठराविक वेळी करायची ठरवले तर शक्यतो ती वेळ पाळावी कारणकी स्वामिना शिस्त प्रिय आहे. पण काही अडचीनी किंवा कारणा त्यावेळी सेवा करणे शक्य झाले नाहीतर दुसऱ्या वेळी सुद्धा करू शकता.
3. आपण सेवा सुरू केल्यावर घरातील व्यक्ति जर मांसाहार बनवण्यासाठी आग्रह करीत असतील तर तुम्ही नॉनव्हेज बनवू शकता पण स्वतः नॉनव्हेज सेवन करू नका. त्यादिवशी सकाळी लवकर उठून सेवा करून घ्या मग नॉनव्हेज बनवू शकता.
4. आपण सेवा सुरू करताना एक संकल्प करून स्वामिना आपले प्रश्न व अडचणी सांगून संकल्प करून सेवा सुरू कुरू शकता. संकल्प करताना आपण स्वामीच्या माठात जाऊन खडीसाखर व नारळ ठेवून करू शकता किंवा आपल्या घराजवळ दत्तगुरूंचे देऊळ असेलतर तेथे सुद्धा जाऊन करू शकता व ते सुद्धा शक्य नसेलतर आपण घरात स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती पुढे सुद्धा संकल्प करू शकता. नुसती खडीसाखर व फूल ठेवून सुद्धा करू शकता.
5. आपण जेव्हा सेवा सुरू करताना स्वच्छ आसन घ्या, ते आसन फक्त आपणच वापरायचे दुसऱ्यां ना वापरायला द्यायचे नाही. स्वामीच्या फोटो किंवा मूर्ती समोर हळद-कुंकू, फूल, दिवा व आगरबत्ती लाऊन निर्मल मनानी सेवा करा. असे हे सोपे नियम आहेत ते पाळून आपण सेवा पूर्ण करू शकता.
6. ब्रह्मचाऱ्याचे पालन केले नाहीतरी चालेल कारणकी काहीजण मुल व्हावे म्हणून सुद्धा प्रयत्न करीत असतील.
आता आपण पाहू या स्वामींच्या कोणत्या प्रभावी सेवा आहेत.:
1. पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्रचे पारायण म्हणजे स्वामी सारामृतचे पारायण होय. ह्या मध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. जर आपल्या कडे पोथी नसेलतर तर आपण बाजारातून विकत आणून पारायण करू शकता किंवा मोबाइलवर सुद्धा डाऊनलोड करू शकता. श्री स्वामी चरित्रचे पारायण म्हणजे स्वामी सारामृतचे पारायण ही एक खूप प्रभावी सेवा आहे. आपण मनोभावे केली तर आपल्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतील.
आपल्याला रोज एका बैठकीत 1 ते 21 अध्याय वाचन करायचे आहेत. एकाच दिवशी 1 ते 21 अध्याय वाचन म्हणजे एक पारायण पूर्ण होते. असे 21 दिवस केलेतर 21 वेळा पारायण पूर्ण होईल.
आपल्याला जर 21 दिवस जमात नसेलतर तर आपण रोज 7 अध्याय वाचून 3 दिवसात एक पारायण पूर्ण करू शकता किंवा रोज 3 अध्याय वाचून 7 दिवसांत एक पारायण पूर्ण होईल. आपल्याला जमेलतसे जास्तीत जास्त पारायण करू शकता.

2. दुसरी सेवा म्हणजे आपण तारक मंत्राचा जाप करू शकता. आपण एक संकल्प करून 21 दिवस रोज 11 माळ जाप करू शकता किंवा रोज 5, 11 किंवा 21 माळ जाप करू शकता.
3. तिसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्र जाप करणे. आपण 21 दिवस रोज 5,7,11 किंवा 21 माळ जाप करू शकता. आपण रोज 3 श्री स्वामी चरित्रचे अध्याय व शरो स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करू शकता. आपण मंत्र जाप सुरू करताना उजव्या हातात एक छोटा पाण्याचा लोटा घेऊन मंत्र जाप करावा. मग मंत्र जाप पूर्ण झाल्यावर मंत्र अभिमंत्रित जल तीर्थ म्हणून घरातील सर्वांना द्या किंवा आजारी माणसाला द्या.
आपल्याला ही चांगली संधि आहे. आपण 21 दिवस स्वामींची सेवा करून आपले प्रश्न, अडचणी दूर करू शकता. आपण वेळ काढून ही सेवा करा, वेळ नाही असे म्हंटले तर आपली सेवा कधीच पूर्ण होणार नाही.