Rice Water Benefits for Health, Skin and Hair In Marathi

Rice Water
Rice Water Benefits

आपण भात जेव्हा कुकर न वापरता भांड्यात बनवतो तेव्हा आपण भात मोकळा होण्यासाठी भाताचे जास्तीचे पाणी बेकार समजून फेकून देतो. तुम्ही जर ही माहिती वाचली तर भातातील जास्तीचे पाणी कधी सुद्धा फेकून देणार नाही.

तुम्हाला भात आवडतो का? व आपण भातातील जास्तीचे पाणी फेकून देता का?

जर आपण असे करीत असाल तर ते चुकीचे करत आहात. कारण की तुम्हाला माहीत नसेल की भाताचे पाणी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती हितावह आहे. जर भाताचे पाणी रोज सेवन केले तर आपण कितीतरी रोगाना पळवून लाऊ शकतो. आपण त्याचे फायदे जाणून घेतल्यावर भाताचे जास्तीचे पाणी कधी सुद्धा फेकून देणार नाही.

The Marathi language Rice Water Benefit for Health, Skin And Hair in Marathi can of be seen on our YouTube Channel of Tips Rice Water Benefits

Rice Water
Rice Water Benefits

भाताच्या पाण्याचे फायदे:
झटपट एनर्जी मिळते:
भाताचे पाणी आपल्या शरीराला झटपट एनर्जी देण्याचे काम करते. कारण की त्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहाइड्रेट असतात त्यामुळे दिवसभर आपल्याला थकवा जाणवत नाही. सकाळी आपण अश्या प्रकारचे पाणी सेवन केले तर एनर्जी बूस्टचे काम करते तसेच त्यामध्ये विटामीन बी, सी, ई व मिनरल आहे. जो थकवा दूर करण्यास मदत करतो.

स्कीन व केस चमकदार बनते:
स्कीन म्हणजेच त्वचा चमकदार बनवण्यासाठी भाताच्या पाण्याचा उपयोग होतो. त्याच बरोबर चेहऱ्यावरील डाग धब्बे कमी होण्यास मदत होते. तसेच त्यामध्ये विटामिन बी भरपूर प्रमाणात आहे. त्यामध्ये ‘इनोसिटोल’ नावाचे तत्व आहे ते रक्तातील पेशी वाढण्यास मदत करते. त्याच बरोबर ब्लड सरक्युलेशन ठीक होऊन आपली स्कीन साफ होते.
भाताचे पाणी सेवनकरणे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे. उन्हाळा ह्या सीझनमध्ये बाहेरून आलेकी एक ग्लास भाताचे पाणी सेवन केले तर थंड वाटते. आजारी माणसाला भाताचे पाणी जरूर द्यावे त्यामुळे अंगातील ताप कमी होण्यास मदत होते.

आपल्या कडे सुपर मॉडेल अभिनेत्री आपल्या स्कीनला भाताचे पाणी लावून आपल्या स्कीनची काळजी घेतात. हा एक घरगुती सोपा उपाय आहे. त्यामुळे स्कीनचा रंग उजळतो. व त्याच बरोबर चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्याच बरोबर त्यामध्ये एंटी ऑक्सिडेन्ट आहेत त्यामुळे स्कीन पण चांगली राहते.
भाताचे पाणी आपले केस चमकदार बनवून तुटण्यापासून भचाव होतो. आपण केसांना शांपु लावल्यावर जेव्हा आपण कंडीशनर लावतो त्या आयवजी भाताचे पाणी लावावे मग केस धुवावे. आठोडयातून 2-3 वेळा केसांना लावावे त्यामुळे केसांची वाढ पण चांगली होते.

भाताचे पाणी कसे बनवायचे:

1 टे स्पून तांदूळ अर्धा तास किंवा रात्र भर भिजत ठेवा मग ते पाणी वापरा.

आपण कुकरमध्ये भात नबनवता भांड्यात भात बनवला तर जास्तीचे पाणी फेकून देतो ते फेकून न देता ते पाणी वापरू शकतो.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.